Friday, November 12, 2010

चांदणे मलाच का फसवून गेले I

असा कसा कोरड़ा राहिलो मी ?
ऊनही पावसात न्हाऊन गेले I

तुझ्या घरी रोज कोजागिरी
चांदणे मलाच का फसवून गेले I

मी दिवा विझवून ही माझ्या हातांनी
संशयी वारे तिथे वाहून गेले I

का रहावे मी ईमानी?
बेईमानी आसवांनी दुख माझे वाहून नेले I

माझ्या डोळ्यात आपली लायकी पाहूनही
सारे बेरड मलाच आरसा दाखवून गेले I

तुझ्या आठवान्चाच प्रकाश आहे हा
तू लावलेले दिवे कधीच विझून गेले II

माझी कविता... मयुरेश साने...

No comments:

Post a Comment