Friday, November 12, 2010

काटयास वेदनेचा ,भलता सराव आहे.

नाही मुकी कळी
हा फूलता गुलाब आहे
काटयास त्या कळेना
कसला रुबाब आहे ?

बळी का उगाच जाती ?
फुलणेच जीव घेणे .
काटाच का बिचारा
बदनाम होत आहे?

इतकी फुले फुलोनी ,आहेत भोवताली
काटयास वेदनेचा ,भलता सराव आहे.

छळते माला कधीचे , ते फुल एक ताजे
फुल पाखरू बनुनी, मी रोज गात आहे .

माझी कविता... मयुरेश साने....

No comments:

Post a Comment