Friday, November 12, 2010

गाईला कुणी तो दोहा ...माझे दुःख पांगळे झाले...

असुनही मी शहाणा....माझे वेडे ठरणे झाले
त्यांनी मागितल्या संधीचे... नेहमीच सोने झाले

पाहूनही मी त्यांना... त्यांची झालो नाही काठी
त्यांना सारे दिसते .....ते ठरवून आंधळे झाले

वर्गणी दक्षिणा सारे ....आर्जवी पुकारे झाले
त्यांचा गल्ला भरला ....माझे खीसे रिकामे झाले

गाईला कुणी तो दोहा ...माझे दुःख पांगळे झाले
कडवे दुःखच आता ...गाण्यातील कडवे झाले

कुसुम गंध माझा मी ...सांगा कधी लपविला होता?
खुडून त्यांनी मजला ...हे पुन्हा कुस्करणे झाले

मी सर्वांचा होतो माझे... कुणी न कधीही झाले
रियाज दांडगा होता ... त्यांचे गळे काढणे झाले

मी कधीही ऋतू प्रमाणे... अमक्याच वेळी न आलो
वसंत हवा कशाला?... माझे ग्रिष्मात बहरणे झाले

अंतर्ल्या भेटी गाठी ... अंतर बहाणे झाले
मी स्वभाव अश्रुचा झालो...अश्रुस वाहणे झाले

मी कैसा आस्तीक होतो ... अनादी अनंताचा
पावला न कधीही त्याला...मखरात बसवणे झाले

नावडत्या प्रश्नाचे जरी ...दिनरात ऊखाणे झाले
फीकीर कुणाची मयुरेश ... तुझे दुःख दीवाणे झाले

.....माझी कविता ..मयुरेश साने.. २४-August-10

No comments:

Post a Comment