Friday, November 12, 2010

दुख्खास जालुनी माझ्या मी निजानंदी तेवावे .

निस्पृह ज्योत बनुनी मी
दिन रात असे पेटावे
दुख्खास जालुनी माझ्या
मी निजानंदी तेवावे .

अंधारल्या दिशांना
दीप दान मी द्यावे.
मग खुशाल रवी बिम्बाने
संध्यालुनिया जावे.

कधी निरांजन कधी नंदादीप
कधी दीपस्तंभ मी व्हावे .
काजवा होउन मी ही
कधी गर्द रानी लुक्लुकावे.

पेटता सोहळा माझा
दिन रात पेट्न्या साठी.
कधी देव घरातील पणती
कधी मशाल क्रांति साठी.

वादळ वार्यानेही ओंजळ बनून रक्षावे
ज्योति ने मग माझ्या तारा बनून जावे.

हर एक कणा तुन पेटुनी
मी मुळी ना विझुन जावे
लावून मनाला चटका
मी तुझ्यातुनी पेटावे.

माझी कविता ..मयुरेश... २७-एप्रिल-2010

No comments:

Post a Comment