Friday, November 12, 2010

जे उत्तर माला हवे ते..ओठातच... दडले होते

ते मुजोर आसमान ही.... तेव्हा रडले होते
माझ्या नयनिचे श्रावण...त्याने ही पाहिले होते

भिजलो जेव्हा तिच्या आठवणीच्या पावसात
कोरडे माझे अश्रु....मी चुप-चाप ढाळले होते

काटेच जरी का उरले आता माझ्या दारी
फूल ते सुगंधी....सांग!... कुणी माळले होते ?

कुस्करून जरी ती गेली.... मनरंग फुलांचे झेले
ताटवे फुलांचे येथे ........मी दिनरात उधळले होते

लाख चुका जरी केल्या...विरहात तुला स्मरताना
ही असून दुबळी झोळी ... मी जोगवे मागितले होते

कारणेच देत रहा!.... तू... कारणांची... विनाकारण
जे उत्तर माला हवे ते..ओठातच... दडले होते

माझी कविता...मयुरेश साने. दि.२९-जुलाई-10

No comments:

Post a Comment