Friday, November 12, 2010

दे ईमानी आसवे !

जीव लावून पनाला
शेते जिवानिशी गेली
कशी एकादशीला
घरी शिवरात्र आली

तुझ्या मायेची पाखर
ओली चिम्ब श्रवण सर
कुठे आटली रे देवा ?
झाले निष्ठुर अम्बर

जीव द्यावा तरी कसा ?
बघ कोरड्या विहिरी
पाण्यानेही काठो काठ
त्यात आत्महत्या केली

ऐन श्रावणात का रे?
तुझे कोरडे आभाळ
फुटे चुडा हिरवा
दिसे बोडखे कपाळ

माझ्या भरल्या डोळ्यांच्या
श्रवण सरींनी
मी पीकविन शेते
करीन हिरवी धारिणी

माझे मातीशी ईमान
पण पिक यावे कसे ?
आसवांचे सिंचन असे ठार खारे कसे ?

एक आभाळ माझ्या ही दाटले रे मनी
दे ईमानी आसवांचे श्रावण नयनी

माझी कविता... मयुरेश साने.

No comments:

Post a Comment