Sunday, September 30, 2012

खूप रडलो बस अता मी रडत नाही

दुख्ख आता पापणीला छळत नाही
खूप रडलो बस अता मी रडत नाही

शेवटी उरली तिजोरी बंद दुख्खे
ठेव सौख्याची मला परवडत नाही

जन्म अख्खा वाहण्यासाठीच नसतो
आसवांना एवढेही कळत नाही

धुगधुगी हरवून बसला कोळसा की
पेटवावा लागतो तो जळत नाही

वाटते कमळा प्रमाणे मी फुलावे
राहणे चिखलातले पण मळत नाही

जीवनाची सावकारी काय सांगू
हात जोडा पाय पकडा टळत नाही

.....................................मयुरेश साने

No comments:

Post a Comment