Sunday, September 30, 2012

आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आठवांचा गाव आल्यावर असे चालायचे
आसवांच्या स्वागताला हुंदक्यांनी यायचे

आपले नाते जणू की पान गळतीचा बहर
मी तुला माळायचे अन् तू मला टाळायचे

तान मुरक्या शब्द सारे चांगले असले तरी
फक्त आलापात असते जे खरे सांगायचे

लावला नाहीस तू ओठी जरी प्याला कधी

पण तुझ्या ओठात माझे जन्म फेसाळायचे

साद होती बोलकी पडसाद होता बोलका
पण तरी हातात नव्हते हात हाती घ्यायचे

.... मयुरेश साने

No comments:

Post a Comment