Sunday, September 30, 2012

चांदणे इतक्याचसाठी टाळले होते

चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णीमेने एकदा मन जाळले होते

एकटे मज सोडुनी गेलीस तू जेव्हा
बाग रुसली बहर सारे वाळले होते

खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते

काळजाचा एक गहिवर अश्रू बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते

मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला कित्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने

No comments:

Post a Comment