चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णीमेने एकदा मन जाळले होते
एकटे मज सोडुनी गेलीस तू जेव्हा
बाग रुसली बहर सारे वाळले होते
खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते
काळजाचा एक गहिवर अश्रू बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते
मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला कित्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने
खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते
काळजाचा एक गहिवर अश्रू बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते
मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला कित्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने
No comments:
Post a Comment